Monday, April 2, 2012

शिक्षकांतील लेखकांचे पुण्यात संमेलन





Maharashtra Times 2-4-2012
म. टा. प्रतिनिधी पुणे 

- १४ व १५ एप्रिलला संमेलन 
- शिक्षकांमधील कलागुणांना वाव देण्याचा हेतू 

शालेय अभ्यासक्रमासह अन्य ललित विषयांवर लिहिण्याचा छंद असलेल्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन येत्या १४ व १५ एप्रिलला पुण्यात होणार आहे. 

संमेलनाचे उद्घाटन शालेय मंत्री राजेंद दर्डा यांच्या हस्ते आणि मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड, भाऊ गावंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. संमेलनाचे संयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेने केले आहे, अशी माहिती संमेलनाच्या स्वागताध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचचे डॉ. वसंत काळपांडे, शैक्षणिक व संशोधन परिषदेचे संचालक नामदेवराव जरग, सहसंचालक डॉ. शंकुतला काळे, दत्ता बाळसराफ आदींची उपस्थिती होती. 

दरवषीर् ११ नोव्हेंबरला शिक्षण दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम घेतो. यंदा यशवंतराव चव्हाण यांची जन्मशताब्दी वर्ष असून त्यानिमित्ताने शिक्षकांविषयी वेगळा उपक्रम करावा यासाठी हे संमेलन आयोजित केले आहे. शिक्षणाशिवाय अन्य गोष्टींमध्ये शिक्षकांना अधिक रस असतो. त्यांच्या छंदावर लक्ष केंदीत करता यावेत यासाठी शिक्षकांना सहभागी करून घेण्यात येत आहे. संमेलनात तीनशे ते चारशे शिक्षक येणे अपेक्षित आहेत, असे सुळे म्हणाल्या. शाळांच्या कामगिरीवर आधारीत शाळांचे प्रगतीपुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे. शाळांच्या सुधारणा, प्रगती, त्यातील त्रुटी, सुधारणा यावर भर देण्यात आला आहे. पंधरा एप्रिलला शालेय राज्यमंत्री फौजिया खान यांच्या हस्ते समारोप होणार असून यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके उपस्थित राहणार आहेत, असे डॉ. काळपांडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment